अध्याय ३ रा
श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला ।
जीवन -विकासाचा बोलिला।
पाया धर्ममय ॥१॥
तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणें सर्वांला ?
मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥
यांचें उत्तर आहे सोपें । जग चाले कोणाच्या प्रतापें ?
आपुलेंच रडें आपणा न संपे । म्हणे जगाचें कैसे होय ? ॥३॥
अरे ! तुम्हांस याची चिंता कशाला ? तें पाहूं द्या निर्मीत्याला ।
तुम्ही साधलिया साधा व्रताला । ब्रह्मचर्याच्या ॥४॥
तुम्ही साधलिया साधा व्रताला । ब्रह्मचर्याच्या ॥४॥
नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळा । परंतु अधःपात टाळा ।
वृत्ति आठवे विषयचाळा ।
तरि सांभाळा गॄहधर्म ॥५॥
चोवीस वर्षे ब्रह्मचर्य । नियमें सांभाळिले वीर्य ।
तरि याने का खुंटेल कार्य
। संसाराचे ? ॥६॥
मुलगा जरा वयांत आला । हवें तैसे वागूं लागला ।
बाळपणीच भोगी तारूण्याला
। जन्म गेला दुःखीं मग ॥७॥
ऐसे क्षयी श्वानसूकर । दुबळे पाप्याचे पितर ।
यांनी होईल का संसार । कधी सुखाचा ? ॥८॥
त्याचें जीवन म्हणजे पाप । त्याचा संसार म्हणजे ताप ।
त्यांचें संतान म्हणजे
शाप । संसारासि ॥९॥
संसार सर्व सुखी व्हावा । आपुलाहि उध्दार घडावा ।
यास्तव ब्रह्मचर्याचा
ठेवा । साधलाचि पाहिजे ॥१०॥
संसारपंथ न मोडावा । प्रजातंतु न खंडावा ।
म्हणोनि ब्रह्मचार्याने साधावा । गॄहस्थाश्रम ॥११॥
ध्यानीं घेवोनि निसर्गनियम । धर्मे योजिला गृहस्थाश्रम ।
ज्याने व्यक्ति -गांव
-राष्ट्र उत्तम । धारणेंत चाले ॥१२॥
इंद्रियांची दुर्धर गति । ती लागेना सहज हातीं ।
पुढे होऊ नये फजीती । म्हणोनि यावें या मार्गी ॥१३॥
येरव्ही लग्न केलेंचि पाहिजे । त्याविण कार्यचि न साजे ।
ऐसा आग्रह धरतील जे । ते
व्यर्थवादी ॥१४॥
जयासि साधे इंद्रियदमन । वृत्ति सत्कार्यी रमे पूर्ण ।
त्याने केलेंचि पाहिजे
लग्न । ऐसें नाही ॥१५॥
परि संसार न करितां विरागी होय । त्यासि आहे महाभय । सेवासाधनाहि
कठिण जाय । बिकट आहे मार्ग तो ॥१६॥
मुक्याने वेद अभ्यासावे । लंगडयाने पर्वतीं चढावें ।
आधंळ्याने युध्द करावें । तैसे कठिण ब्रह्मचर्य ॥१७॥
हें साधणें सोपें नाही । तैसीच ही निसर्गाशीं लढाई ।
म्हणोनि त्याचा राजमार्ग
तोहि । कथिला धर्मे ॥१८॥
मुलगा धर्मविद्या शिकला । अभ्यासाने सदगुणी झाला । शक्तियुक्तींनी
उंबरठा गांठला । तारुण्याचा ॥१९॥
घडलें निष्ठावंत ब्रह्मचर्य । शरीरीं प्रगटलें ओजवीर्य ।
निसर्गेचि झालें अनिवार्य
। लग्न करणें ॥२०॥
न जाणों लग्नासि झाला उशीर । घडेल झणी दुर्व्यवहार ।
म्हणोनि वडील होती चिंतातुर । मुलासाठी ॥२१॥
म्हणोनि वडील होती चिंतातुर । मुलासाठी ॥२१॥
योग्य देती लग्नसंस्कार । बालपणाचा पाडोनि विसर ।
करिती तया जबाबदार । दीक्षा देवोनि संसाराची ॥२२॥
गृहस्थाचा काय धर्म । कोणतें आचरण काय वर्म ।
कैसें आचरावें कर्म । गृहस्थाश्रमा शिकविती ॥२३॥
आजवरि होता ब्रह्मचारी । आता वाढली जबाबदारी ।
पत्नी येंता आपुल्या घरी ।
घरचि लागे साधावें ॥२४॥
मागे विद्यार्जनाचा व्यवहार । पुढे पाऊल पडे कामावर ।
म्हणोनि सावध - सावधान सत्वर । बोलती ज्ञाते ॥२५॥
म्हणोनि सावध - सावधान सत्वर । बोलती ज्ञाते ॥२५॥
निधि घेऊनि ज्ञानाचा । मार्ग सुधारावा जीवनाचा ।
धर्म साधावा कुटुंब
-राष्ट्राचा । याचसाठी सावधान ॥२६॥
प्रकृतीचा संयोग दिला । व्यक्तीने कुटुंबरूपें विकास केला ।
तेणें घराचा भाग पडला । अंगावरि ॥२७॥
कैसे घडेल उद्योग करणें । आपुला सर्वांचा निर्वाह साधणें ।लग्नसंस्कारें लाविली बंधनें । समाजधर्माचीं ॥२८॥
एकपत्नीव्रता घ्यावें । वाईट कुणाकडे न बघावें ।
हेंच निश्चयाने शिकवावें । लागे तया ॥२९॥
काहीं घडतां दुर्व्यवहार । कलंक लागे घराण्यावर ।
म्हणतील मुलगा कुलांगार । जन्मा आला ॥३०॥
याच कारणासि जपावें । सात्विक मार्गां अवलंबावें ।
संती सांगितले जें बरवें ।
तेंचि करावें सर्वथा ॥३१॥
एकांतीं लोकांती स्त्री पाहोन । होऊं न द्यावें वृत्तीचें उत्थान ।
प्राण गेलियाहि अमोल जीवन । खोंवू नये कुमार्गीं ॥३२॥
प्राण गेलियाहि अमोल जीवन । खोंवू नये कुमार्गीं ॥३२॥
एका पत्नीसि शास्त्रें नेमिलें । ऐशा गृहस्थाश्रमीं राहिलें ।
तरी तो ब्रह्मचारीच म्हणविलें । पाहिजे आम्हीं ॥३३॥
गृहस्थाश्रम जरी घेतला । पथ्याने विषयीं वागला ।
तरी तो ब्रह्मचारीच समजला । जातो गृहस्थ ॥३४॥
त्यासाठीं उभयतांनी पाळावा संयम । कारणाविण नको समाग।येरव्ही आपले
व्रतनियम । दोघांनीहि आचरावें ॥३५॥
संतानाकरितांच वीर्य देणे । येरव्ही आपुलें ब्रीद रक्षिणें ।
ऐसें साधलें जीवन ज्याने ।
महान तपस्वी ॥३६॥
अहो ! लग्न जरी केलें । तरी विषय -दास्य नाही सांगितलें ।
जन्म निभवावयासि मिळविले । साथीदार लग्नाने ॥३७॥
जिंकावया कामवृत्ति । पत्नी , नव्हे वाढवाया ती ।
उत्तममार्गे मिळवावी
संपत्ति । तीहि आसक्ति जिंकाया ॥३८॥
जीवन -शक्ति एक झाली । तेणें सुकीर्ति प्रकाश पावली ।
सतकार्य -कळी उमलों लागली
। ऐसें व्हावें ॥३९॥
सुख व्हावें मातापित्यासि । बंधुभगिनी आणि इतरांसि ।
वागण्याची रीति ऐसी । मोह पाडी सर्वांना ॥४०॥
वागण्याची रीति ऐसी । मोह पाडी सर्वांना ॥४०॥
मोकळें बोलणें गोजिरवाणें । चाल चालणें चारित्र्याने ।
जीवन कंठणे उज्ज्वलतेने ।
थोरामोठयांचें पाहूनि ॥४१॥
संतॠषींनी कथिले ज्ञान । त्याचें करणें अध्ययन ।
यानेच फिटेल ॠषिॠण ।गृहस्थाचें ॥४२॥
संतान करावें आदर्श साचें । तरि ॠण फिटे मातापित्याचें ।
अथवा आपणचि नाम वाढवावें तयांचें । देशसेवेने ॥४३॥
अथवा आपणचि नाम वाढवावें तयांचें । देशसेवेने ॥४३॥
विश्वीं देव जाणूनि सेवावा । तोचि वैश्वदेव बरवा ।
प्राणीमात्रासि वाटा द्यावा । हाचि यज्ञ पावन ॥४४॥
प्राणीमात्रासि वाटा द्यावा । हाचि यज्ञ पावन ॥४४॥
यानेचि फिटे देवॠण । गृहस्थाश्रमी सर्वांचें जीवन ।
संतोषवावे दीन दुःखी जन ।
सेवाभावें ॥४५॥
उचित करावी कुटुंबसेवा । जीवसेवा , ग्रामसेवा ।
ध्यानधारणेचा ठेवा । त्रिकाळ नेमिला सर्वांसि ॥४६॥
गृहस्थाश्रमीं ऐसें वर्तलें । अतिमहत्त्व जीवना आलें ।
साधुसंती गौरविलें । ऐशा
गृहस्थाश्रम ॥४७॥
असो कोणताहि आश्रम । त्यांत मुख्य असे संयम ।
विकासाचा वाढता क्रम । त्यागबुध्दीच्या ॥४८॥
गृहस्थासि संतान झाले । उपभोगाचें पारणें फिटलें ।
पुढे संस्कार बळावले । त्यागवृत्तीचे ॥४९॥
आपुली असली -नसली हौस । वाहे मंद सावकाश ।
सुख व्हावें पुत्ररत्नास ।
वाटे पित्यासि ॥५०॥
आपणासि आवडे घास । तो राखून देई तयास ।
दुसर्याच्या सुखार्थ भोगी
त्रास । हें शिक्षण गृहधर्मी ॥५१॥
त्याच्या गुणात आपुलें भुषण । त्याच्या कीर्तीत समाधान ।
तो वाईट होतां दुषण । लागेल आम्हां ॥५२॥
तो वाईट होतां दुषण । लागेल आम्हां ॥५२॥
ऐसी धरोनि दूरदृष्टी । व्हावें लागे त्यासाठी कष्टी ।
प्रसंग पडतां उठाउठी ।
धांवूनि झेली स्वतःवरि ॥५३॥
परि आपुल्या पुत्राकारणें । कोणावरि अन्याय न करणें ।
आपुल्या ऐसींच समजणें । मुलें सर्वांचीं ॥५४॥
सर्वांकरितांच झटावें । ऐसें व्यापकपण साधावें।
हेंच गृहस्थाश्रमीं शिकावें । लागे तत्व ॥५५॥
पुत्रावरि दया करी । तीच दासदासीवरि ।
पंक्ति प्रपंच नाही अंतरी । तोचि धन्य गृहधर्म ॥५६॥
पुत्र शिकून मोठा झाला । एक होता दुसराहि जन्मला ।
तिसरा होतांचि संसार संपला । पाहिजे पित्याचा ॥५७॥
न संपतां मग यातना । भोगाव्या लागताति नाना ।
वानप्रस्थाश्रम म्हणोनिच जाणा । योजिला धर्मसंस्कारें ॥५८॥
वानप्रस्थाश्रम म्हणोनिच जाणा । योजिला धर्मसंस्कारें ॥५८॥
ऐसें जयाने साधलें । त्यासीच ’पुरूष ’ म्हणणें शोभलें ।
येरव्ही ते विषयी झाले ।
गधे घोडे वानर ॥५९॥
मीं तों ऐसें नवल पाहिले । एकाने चाळीस विवाह केले ।
त्यास साठ पुत्र झाले । ते
राहिले शेतावरि ॥६०॥
एका शेतावरि एक पत्नी । चिमण्या हाकली महाराणी ।
लग्न म्हणजे आमदानी । जंगलीजेठांची ॥६१॥
असा हा संसाराचा तमाशा । वारे संसाराची आशा ।
सगळया आयुष्याची दुर्दशा ।
वासनेपायीं ॥६२॥
काहीं दोनचार स्त्रिया करिती । आयुष्य सर्वांचे नागविती ।
ही तों आहे पशुवृत्ति ।
गृहस्थाश्रम म्हणों नये ॥६३॥
पुरुषा बहुपत्नींचा अधिकार । स्त्रियांनी कां न करावे चार ?
हा दुर्गतीचाचि विचार । दोघांचाहि ॥६४॥
एका स्त्रियेसि दहा पति । अजूनहि कोठे असे ही रीति ।
त्या माऊलीची कोण गति ।
देव जाणे ॥६५॥
हा सर्व अज्ञानाचा पसारा । वाढवाल तेवढा वाढे भारा ।
म्हणोनि आळा या विकारा । घातलाचि पाहिजे ॥६६॥
म्हणोनि आळा या विकारा । घातलाचि पाहिजे ॥६६॥
एकदा एक पत्नी केली । पुढे पत्नीची भाषाचि संपली ।
तरीच दोघांनाहि लाभली ।
शांति संसारी ॥६७॥
संसार सदाचाच अपूर्ण । विकारी नसे समाधान ।
ऐसी गाठीं बांधोनि खूण ।
विचारें सुख साधावें ॥६८॥
दोघांचें व्हावें एक मन । तेथेचि नांदे स्वर्ग पूर्ण ।
होतां आदर्श संतान । पांग फेडील देशाचा ॥६९॥
यावरि श्रोतीं विचारलें । संतानासाठी लग्न नेमिलें ।
परि एका स्त्रियेसि संतान न झालें । म्हणूनि केलें दुजें लग्न ॥७०॥
त्यासि निषधिलें आपण । आता सांगा न होतां संतान ।
कैसें फिटूं शकेल ऋण ।
देशाचें आणि वडिलांचें ? ॥७१॥
लग्न केलियाहि वरि । पुत्र न होतां उदरीं ।
म्हणती त्यास अधोगति सारी
। प्राप्त होते ॥७२॥
याचें उत्तर यथार्थ ऐका । हा समजचि वेडयासारखा ।
सेवेने ज्ञानाने
मुक्तिसुखां । प्राप्त होतो कोणीहि ॥७३॥
पुत्र न होतांचि एक । संन्यासी ब्रह्मचारी कित्येक ।
तरले ऋषिमुनि संत देख । बुडालीं अनेक श्वानसूकरें ॥७४॥
’ निपुत्रिकास अधोगति ’ । ऐसें जे ग्रंथवेत्ते म्हणती ।
त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ति । दुसरी होती ॥७५॥
भारतीं ऐसा काळ आला । संन्यास देती ज्याला त्याला ।
महत्त्व न द्यावें
लग्नकार्याला । ऐसें झाले ॥७६॥
ज्यानें त्याने तप करावें । ऐसें धरलें बहुतांच्या जीवें ।
म्हणोनि हें बंधन घालावें । लागलें ग्रंथकर्त्यां ॥७७॥
पुत्र व्हावा कुल -उध्दारी । येरव्ही ती वाझंचि बरी ।
ऐसेंहि बोलिलें निर्धारी ।
ग्रंथामाजीं ॥७८॥
यांतूनि हाच निघे सार । समाजधारणेसाठी संसार ।
पुत्र नसतांहि होतो उध्दार
। प्रयत्नशील गृहस्थाचा ॥७९॥
समाजाच्या उनत्तीचें सुत्र । खंडूं न द्यावें सर्वत्र ।
यासि पूरक तोच योग्य पुत्र । बाधक तारि ती अधोगति ॥८०॥
’ पापपुण्य आपुलें आपणा ।
पुत्रबंधु न तारी कोणा । ’
ही ग्रंथांची सत्य घोषणा
। विसरूं नये कोणीहि ॥८१॥
एक पुत्र जरी नसला । सर्व पुत्र आपुलेचि म्हणाला ।
सर्वाच्याहि उपयोगा झाला । तरि झाला उध्दार त्याचा ॥८२॥
असेल मुलासाठी धन । करावें सत्कार्यासि अर्पण ।
यांत भावना ठेवूं नये
भिन्न । तरीच पावे सदगति ॥८३॥
आपुलें घरचि नव्हे घर । विश्व आपुलें मकान सूंदर ।
हेंचि शिकावया असे संसार ।
उध्दार तो याच मार्गे ॥८४॥
ऐसा करावा पूर्ण विचार । दोघांनी आपुलें शोधोनि अंतर । दूरदृष्टीचा
साधावा व्यवहार । पुत्र असले नसले तरी ॥८५॥
मन काढावें घरांतूनि । पुत्रास जबाबदारी समजावोनि ।
पुत्र नसतां गावांस अर्पूनि । देशाटनीं निघावें ॥८६॥
निघावें पत्नीस घेऊनि। जी धर्मअर्थकामीं सांगातिणी ।
ती जरि साथ न दे
मोक्षसाधनीं । पुत्राजवळी राहूं द्यावें ॥८७॥
पत्नी जरी देई सहयोग । तरी जीवनीं वर्जावा भोग ।
दोघांनाहि अंगी बाणवावा त्याग । निश्चयाने त्यापुढे ॥८८॥
कार्य संपले संसाराचें । पुढील जीवन वानप्रस्थाचें ।
मिळोनी तपाचे सदवर्तनाचे ।
धडे पाळावे दोघांनी ॥८९॥
पाहावीं विशाल स्थानें मंदिरें । तीर्थें वनें मुनि -कुटीरें ।
अनासक्त व्हावया मनें शरीरें । चित्त लावावें सत्कार्यीं ॥९०॥
सर्वकार्यासि वाहून घ्यावें । अध्यात्मभावा अनुभवीत जावें ।
आणिकासहि धडे द्यावे । शिकवावा सेवाभाव ॥९१॥
सेवेसाठी घ्यावी दीक्षा । न्यावी लया गांवाची अवदशा ।
काम करावें भरूनि हर्षा । सर्वांसाठी अंतरी ॥९२॥
शिक्षणसंस्था , आश्रमसंस्था ।
सत्संगसंस्था परमार्थसंस्था ।
यांची करावी सर्व व्यवस्था
। शांतीसाठी ॥९३॥
अंध पंगु महारोगी । अनाथ आणि वॄध्द जगीं ।
आश्रम चालवावे जागजागीं ।
त्यांच्या सेवेचे ॥९४॥
गृहस्थांना वेळ न फावे । म्हणोनि वानप्रस्थें लक्ष द्यावें ।मुलाबाळांसि संगोपावें । ब्रह्मचारि रक्षूनि ॥९५॥
द्यावें जीवनाचें शिक्षण । जेणें कार्यकर्ते निघतील पूर्ण ।
सर्वांगीण उन्न्तीचें ज्ञान । द्यावें तयां आश्रमस्थानीं ॥९६॥
हें कार्य वानप्रस्थाने करावें । घरादारांचे बंध तोडावे ।
अनासक्तीने वागावें । सेवेसाठी सर्वांच्या ॥९७॥
अनासक्तीने वागावें । सेवेसाठी सर्वांच्या ॥९७॥
नुरतां संसारात वासना । वैराग्य येतें सहज वर्तनां ।
उरले तें हेचि कार्य जाणा
। शिक्षण द्यावें सर्वांसि ॥९८॥
ग्रामसेवाचि देशसेवा । देशसेवाचि ईश्वरसेवा ।
हेंचि अनुभवावया जीवभावा ।
वानप्रस्थ आश्रम ॥९९॥
तिसरा वानप्रस्थ आश्रम । हा संन्यासाचा उपक्रम ।
व्हावया वासनेचा उपशम ।
अंतरामाजीं ॥१००॥
पुढे आहे संन्यासधर्म । वानप्रस्थाचा तोडण्यासि भ्रम ।
अनुभवूनि आत्माराम । वृत्ति उपराम कराया ॥१०१॥
जेव्हां घरांतूनि मन निघालें । सर्वदेशी होऊनि सेवे लागलें ।
संन्यासवृत्तीने क्रमें साधलें । परमात्म्य अंगी ॥१०२॥
संन्यासी शिकवी वानप्रस्थासि । शेवटीं स्थितप्रज्ञता कैसी ।
प्राण गेल्याहि आसक्क्तीसि
। स्पर्श मुळी होईना ॥१०३॥
वानप्रस्थीं संसार त्यागला । संन्यस्तीं स्वरूपं योग झाला ।
परम रस वृत्तीने चाखला । धागाचि खुंटला आसक्तीचा ॥१०४॥
कळला आत्मा -परमात्मा सकळ । जीव -ब्रह्म कैवल्य केवळ ।
प्रज्ञावॄत्ति होय निश्चळ । स्वरूपामाजीं ॥१०५॥
ही स्थितप्रज्ञता अंगी मुरली । त्यासि जीवन्मुक्ति लाभली ।
याचि देहीं त्याने साधली । पूर्ण सफलता जीवनाची ॥१०६॥
तो सकळां झाला स्फूर्तिदायक । निःस्पृहतेने मार्गदर्शक ।
जीवनदृष्टी देई सम्यक । सर्व जगाला ॥१०७॥
जीवनदृष्टी देई सम्यक । सर्व जगाला ॥१०७॥
हेंचि सत्य -धर्माचें ध्येय । हेंचि सर्व कर्मांचें श्रेय ।
सर्व ग्रंथाचें हेंचि
तात्पर्य । तुकडया म्हणे ॥१०८॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र -स्वानुभव संमत ।
तिन्ही आश्रम निरूपिले येथ । तिसरा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा