.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

सोमवार, ५ जून, २०१७

ग्रामगीता - प्रस्तावना



सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारे, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारे स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारे सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारे राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.
भारत हा खेड्यांचा देश आहेहे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईलअशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईलयाविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होती. त्यामुळं त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यातयाविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उपकारक ठरल्या. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईलयाविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होतीती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावेसुसंस्कृत व्हावेग्रामोद्योग संपन्न व्हावेतगावानेच देशाच्या गरजा भागवाव्यातग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वेप्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावेअसा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप म्हणजे 'ग्रामगीता '.
                             तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धीग्रामनिर्माणग्रामरक्षणग्रामआरोग्यग्रामशिक्षणग्रामकुटुंबग्रामप्रार्थनाग्राममंदिरेग्रामसेवाग्रामसंस्कारग्रामउद्योगग्रामसंघटनग्रामआचार या साऱ्यांचा सूक्ष्म विचार "ग्रामगीताया ग्रंथात केला आहे.
या ग्रामगीतेमध्ये एकेचाळीस अध्यायात आठ पंचके आहेत. सद्‌धर्ममंथनलोकवशीकरणग्रामनिर्माणदृष्टिपरिवर्तनसंस्कारशोधनप्रेमधर्मस्थापनदेवत्वसाधनआणि आदर्श जीवन अशी ती आठ पंचके म्हणजे ग्रामजीवनाच्या विकास संकल्पनेतील अष्टमहासिद्धीच होत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेतत्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावीमानवतेचे तेज झळाळावेया आर्त तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धीचे पूर्णत्व आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे.
१९५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकाला एकदोन नाहीतब्बल नऊ प्रस्तावना आहेत. शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणा-या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात करून दिलेली ओळख आहे. प्रस्तावना लिहिणा-यांत विनोबागाडगेमहाराजमामासाहेब सोनोपंत दांडेकरदादा धर्माधिकारीश्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात टॉपची मंडळी आहेत. तर वि. स. खांडेकरवि. भि. कोलते आणि ग. त्र्यं. माडखोलकर अशी साहित्यातली दादा माणसंही आहेत. शिवाय तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लिहिलं आहे.
आपणा सर्वांसाठी ही 'ग्रामगीतायेथे सादर करीत आहोतमुळ मराठी ओव्या व त्यांच्या इंग्रजी भाषांतरासहित.
साभार - khapre.org आणि  gramgeeta.org


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।